अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

Updated: May 10, 2012, 09:21 AM IST

www.24taas.com,चिचगड

 

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

 

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.  अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. मात्र अजून  त्यांचा तपास लागलेला नव्हता. दरम्यान,  विशेष म्हणजे सरपंच पोरेट्टी हे नक्षलसमर्थक असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

 

छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील  इस्तारी गावात सोमवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास १५ ते २० नक्षलवाद्यांनी सरपंचांच्या घरी घुसून त्यांचे अपहरण केले होते. परंतु अपहणानंतरही त्यांच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. आज भंडारा जिल्ह्यात  पोरेट्टी यांचा मृतदेह सापडला.