आजचा दिवस अपघातांचा

आज दिवसभरात राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. नवी मुंबईतील नेरुळ इथे ट्रक,टँकर आणि ओम्नीच्या विचित्र अपघातात एका दाम्प्त्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.

Updated: Jan 1, 2012, 09:35 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

आज दिवसभरात राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. नवी मुंबईतील नेरुळ इथे ट्रक,टँकर आणि ओम्नीच्या विचित्र अपघातात एका दाम्प्त्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.

 

तर रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. कंटेनरने सायकल आणि टेम्पोला दिलेल्या धडकेत सहा जण ठार झालेत. तर तिघे जखमी झालेत. दुस-या एका अपघातात कंटेनरनं स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झालेत. गोव्याहून मुंबईकडे येणा-या स्कॉर्पिओला निवळी फाट्याजवळ अपघात झाला. कंटेनर आणि स्कॉर्पिओमध्ये हा समोरासमोर अपघात झाला.

तिसरा अपघात इगतपूरजवळ झाला. ट्रॅक्टर आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात चार ठार आणि सहा जण जखमी. हा अपघात घोटी ते सिन्नरच्या दरम्यान झाला.