ऑडिट मतदारसंघाचं : कल्याण

ऑडिट मतदारसंघाचं : कल्याण

Updated: Apr 4, 2014, 04:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेला केवळ एकाच मतदारसंघानं साथ दिली होती. शिवेसेनेला साथ देणा-या या मतदारसंघातील खासदाराने नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. महाराष्ट्राचं सांस्कृतिक उपकेंद्र असलेल्या या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत.
ज्या गावात प्रत्येकाचा एक तरी नातेवाईक असतो, ते गाव म्हणजे डोंबिवली, अशा शब्दांत साहित्यिक शं. ना. नवरे यांनी डोंबिवलीची ओळख करून दिली होती. राज्याचं सांस्कृतिक उपकेंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. मराठी माणसाचं दाटीवाटीनं वसलेलं उपनगर म्हणजे डोंबिवली-कल्याण. याच कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथचा भाग जोडला गेलाय.
अंबरनाथ म्हटलं की आठवण येते ती तिथल्या पुरातन शिवमंदिराची.. शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले हे हेमाडपंथीय शैलीचं मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, आणि याच मतदारसंघात भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असलेल्या वस्तू मिळण्याच ठिकाण मेड इन यूएसए अर्थात उल्हासनगरसुद्धा आहे.
कळवा-मुंब्रा-दिवा असा ठाणे महानगरपालिकेचा भाग, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरषिद तसंच कल्याण ग्रामीण हा ठाणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणारा भाग अशी मिसळ सरमिसळ होऊन कल्याण लोकसभा मतदारसंघ बनलाय. शहरी, ग्रामिण तर काही भागांत झोपडपट्टी असं इथलं संमिश्र चित्र आहे.
बहुसंख्य मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाज हे या भागाचं वैशिष्ट्य. शिवसेनेचा गड असलेल्या कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा मतदारही मोठ्या प्रमाणात आहे.
 
कल्याण लोकसभा मतदार संघात 2009 नुसार 15 लाख 88 हजार 507 मतदार होते. यापैकी  8 लाख 57हजार 32 पुरुष मतदार आहेत. तर  7 लाख 31 हजार 475 महिला मतदार आहेत.
पुनर्रचनेआधी ठाणे लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघात १९७७ पासून सेना-भाजपाचे वर्चस्व कायम राहिलंय. आधी जनसंघ नंतर भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघातून १९७७ आणि १९८० ला रामभाऊ म्हाळगी, १९८१ च्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील  आणि १९८९ आणि १९९१ ला राम कापसे यांनी भाजपचा झेंडा फडकावला.
१९८४ ला काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी हिंदूत्ववादी पक्षांवर विश्वास टाकला. त्यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला आणि १९९६, १९९८, १९९९, २००४ असा सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले.
२००९ च्या मतदार पुर्नरचनेत हा भाग ठाणे लोकसभा मतदार संघातून वगळण्यात आला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या नावाने नवा मतदारसंघ बनला. २००९ ला प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे कल्याणमधून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र सध्या तांत्रिदृष्ट्या  शिवसेनेत असलेले सध्या आनंद परांजपे मनाने राष्ट्रवादीबरोबर आहेत.
 
विधानसभेतील सध्याचं संख्याबळ लक्षात घेतलं तर मुंब्रा-कौसा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, डोंबिवलीमधून भाजपाचे रविंद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे रमेश पाटील, कल्याण पूर्वमधून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गणपत गायकवाड, उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी तर अंबरनाथमधून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर निवडून आले आहेत.
परांजपेंच्या निमित्तानं राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला शॉक, मनसेचा प्रभाव आणि मनोहर जोशींचा कल्याणमध्ये पत्ता कट झाल्यानं आता शिवसेना नक्की कोणता चेहरा देणार यावरच शिवसेनेचा जय पराजय निश्चित होणार.
 
शिवसेनेचे सदस्य असुनही मनाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेले कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आनंद परांजपे ह्य़ांची ओळख
खासदार आनंद परांजपे यांची ओळख
खासदार - आनंद प्रकाश परांजपे
 जन्म - 16 मे 1973
 वय -  40
 शिक्षण - बी.ई ,एमबीए
वडिल प्रकाश परांजपे यांची पुण्याई हेच खासदार आनंद परांजपेंचं संचित. प्रकाश परांजपे सलग चार वेळा शिवसेना खासदार म्हणून निवडून आले. आनंद परांजपे त्यांचे पुत्र. प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात फारसे परिचित नसतानाही, केवळ प्रकाश परांजपेंचे पुत्र म्हणून शिवसेनेने आनंद परांजपेंना खासदारकीचं तिकीट दिलं.
आधी ठाण्यातून आणि नंतर कल्याणमधून ते खासदार म्हणून निवडून आले. अधुनमधून ते शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसायचे.
पण पक्षात कुठलीही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती. आमदार एकनाथ शिंदे यांना दंडवत घालणे यां व्यतिरिक्त त्यांनी कोणते काम केले हा प्रश्न