LIVE -निकाल चंद्रपूर

प्रोफाईल मतदारसंघाचं : चंद्रपूर

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
संध्याकाळी 6: 36 वाजता अपडेट अशोक नेते - 2 लाख 36 हजार 540 मतांनी विजयी

संध्याकाळी 6:11 वाजता अपडेट चंद्रपूर - हंसराज अहिर 24व्या फेरीनंतर 233858 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 6:00 वाजता अपडेट 23व्या फेरीनंतर हंसराज अहिर 2,28,136 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 5:45 वाजता अपडेट चंद्रपूर 21 फेरीनंतर हंसराज अहिर 2,14,072 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 5:18 वाजताअपडेट चंद्रपूर- हंसराज अहिर 2 लाख 5 हजार 6 मतांनी आघाडीवर
सकाळी 10:17 वाजताअपडेट चंद्रपूर - हंसराज अहिर आघाडीवर
मतदारसंघ : चंद्रपूर
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६५.१०टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – संजय देवतळे
महायुती – हंसराज अहीर (भाजप)
अपक्ष – वामनराव सुधैशैरा
बसपा - हंसराज कुंभारे
आरपीआय - अशोक खंडाले

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
हंसराज अहिर – भाजप – ३,०१,४६७ मतं - ३३.५५%
नरेश पुगलिया – काँग्रेस - २,६८,९७२ मतं - २९.९४ %
वामन चटप - स्वतंत्र भारत पक्ष – ५७,५१९ मतं - ६.४०%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,३६,३५२
पुरुष : ७,९६,१५६
महिला : १५,३६,३५२
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 कोळसा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी भाजपचे खासदार हंसराज अहिर यांनी सरकारशी पत्रव्यवहार केला होता. हा घोटाळा उघडकीस येताच अहिर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला.
 अहिर हे पुन्हा लढणार असले तरी त्यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
 चंद्रपूरमधील काँग्रेस ही विभागलेली आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांचा लागोपाठ दोनदा पराभव झाला. त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.
 सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्याकडे लोकसभेचे उमेदवार म्हणून बघितले जात होतं. देवतळे यांच्या समाजाची मते मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर आहेत.
 काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही सारे काही आलबेल नाही. माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यातून विस्तव जात नाही.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
 अत्यल्प सिंचन सोयी, राज्याच्या राजधानीशी जोडणारी सरळ रेल्वे गाडी नाही.
 शेकडो खनिज प्रकल्प मात्र खनिज विकास निधी अपुरा.
 हे क्षेत्र देशातील प्रदुषणाच्या नकाशावर पहिल्या तीन शहरांमध्ये

 बेसुमार जंगलतोड
 वन्य प्राण्याच्या हल्ल्यानंतर मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प
 ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी बफर क्षेत्र घोषित केल्याने ८० गावांचा विकास रखडला
 वणी-आर्णी या क्षेत्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न
 शासनाने जाहीर करूनही सामुहिक व वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्याची प्रक्रिया रखडली.
जातीपातीची समीकरणं
 तेली-माळी-कुणबी प्राबल्याचे क्षेत्र, आदिवासींची निर्णायक मते, अडीच लाख बौद्ध, 70 हजार मुस्लिम, 10 लाख मराठी भाषिक, एक लाख हिंदी भाषिक, तेलुगु 1.25 लाख
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.