१२ वर्षांच्या मुलाचा हवनकुंडात टाकले, दिला बळी

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका चिमुड्याची बळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्र-मंत्र करण्याचा नादात एका तांत्रिक हैवान बनला. त्याने मुलांचे तुकडे करून हवनकुंडात टाकले. तांत्रिक अघोर वैष्णव साधना पीठाचे उपेंद्राचार्य उर्फ उपेंद्र तिवारी आणि त्याच्या काही शिष्यांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Jun 30, 2014, 06:39 PM IST
१२ वर्षांच्या मुलाचा हवनकुंडात टाकले, दिला बळी title=

वाराणसी : उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका चिमुड्याची बळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्र-मंत्र करण्याचा नादात एका तांत्रिक हैवान बनला. त्याने मुलांचे तुकडे करून हवनकुंडात टाकले. तांत्रिक अघोर वैष्णव साधना पीठाचे उपेंद्राचार्य उर्फ उपेंद्र तिवारी आणि त्याच्या काही शिष्यांना अटक करण्यात आली आहे.

बळी देण्याचा प्रकार गोपीगंज भागात झाला. तिलंगा गावातील प्रदीप कुमार दुबे यांचा मुलगा सुमित (१२) पंधरा दिवसापूर्वी बेपत्ता झाला होता. भंडाऱ्याला जातो असे  सांगून तो घरातून गेला होता. त्यानंतर त्याचा कुठेच पत्ता लागला नसल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तीन दिवसांनंतर सुमितचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. शरिराचे काही भाग गायब झाले होते.

या प्रकरणी चौकशी पथकाने संशयाच्या आधारावर शिवभुवन आणि रवींद्र शर्मा यांना ताब्यात घेतले. दोघांनी सांगितले की, गुरू उपेंद्र तिवारी यांनी सुमितचा बळी दिला आहे. दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेले आणि तांत्रिकाला अटक केले.  

पाच वर्षांपासून यज्ञ करण्याचा नावाने तांत्रिक तिलगा गावात राहत होता. याच तांत्रिकाने बळी देण्यासाठी सुमितला शिष्यामार्फत पकडले. मेंदू काढण्यासाठी तांत्रिकाने सुमितच्या डोक्यावर वीट मारली. सुमित ओरडू लागला. प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी तांत्रिकाने दोन्ही शिष्यांसह सुमितची गळा दाबून हत्या केली. रात्री मृतदेह एका विहिरीजवळ नेऊन शरिराचे काही भाग कापले.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.