तेलंगणात अपघात, महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात एका रस्ते अपघातात महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झालाय. 

Updated: May 15, 2016, 09:49 AM IST
तेलंगणात अपघात, महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू  title=

हैदराबाद : तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात एका रस्ते अपघातात महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झालाय. 

अपघातग्रस्त कुटुंब महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातलं असल्याचं सांगितलं जातंय. ते अदिलाबादच्या पोच्चम्मा मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. 

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला आणि सात मुलांचा समावेश आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भाइन्साच्या बाहेरील भागात घडलीय. शनिवारी जवळपास अर्ध्या रात्री हा अपघात घडल्यानं वेळेत उपचार मिळणंही कठिण होऊन बसलं. 

एक टिपर ट्रक आणि एका ऑटो रिक्षाचा अपघात घडला. हा ट्रक धान्यानं भरला होता. अपघातानंतर त्यातील सामानाचं वजन अंगावर पडल्यानं १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारसाठी घेऊन जात असताना इतर दोघांनी आपला प्राण सोडला. जखमींना निझामाबाद हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.