मुलीची पाठवणी केल्यानंतर सात तासांत घरी परतला मृतदेह

ज्या मुलीचं लग्न करून पाठवणी केली त्याच मुलीचा मृतदेह लग्नानंतर अवघ्या काही तासांत एका पित्याला आपल्या हातात घ्यावा लागलाय. 

Updated: Apr 23, 2016, 09:35 AM IST
मुलीची पाठवणी केल्यानंतर सात तासांत घरी परतला मृतदेह title=

इंदौर : ज्या मुलीचं लग्न करून पाठवणी केली त्याच मुलीचा मृतदेह लग्नानंतर अवघ्या काही तासांत एका पित्याला आपल्या हातात घ्यावा लागलाय. 

इंदौरमध्ये राहणाऱ्या चौहान आणि ठाकूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. रुपा आणि दिनेश यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर मुलीची पाठवणी करत रुपाच्या वडिलांच्या डोळे आनंदानं भरून आले होते... खूप सारे आशिर्वाद आणि शुभेच्छा देत वधूला त्यांनी मोठ्या प्रेमानं निरोप दिला... पण,

अवघ्या काही तासांतच रुपाच्या मृत्यूची बातमी तिच्या वडिलांना समजली... अगोदर त्यांना या बातमीवर विश्वासच बसला नाही... तेव्हा त्यांनी दिनेशच्या मोबाईल कॉल करून पाहिला... तो लागला नाही म्हणून त्यांनी दिनेशच्या वडिलांना फोन केला... तर समोरून रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला... आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

कसा झाला अपघात...

लग्नानंतर घरी परतत असताना वधू-वराच्या गाडीला अपघात झाला... त्यांची कार समोरून येणाऱ्या एका ट्रकवर आदळली आणि या अपघातात या दोघांसहीत सात जणांचा मृत्यू झाला. इतर वऱ्हाडी मंडळी बसमधून प्रवास करत होते. त्यांना अपघाताची बातमी समजताच त्यांनी जखमींना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवलं... पण, एव्हाना वेळ निघून गेली होती. 

वराचे पिता दोन तास बेशुद्ध
या अपघातात नवरा मुलगा दिनेश आणि त्याच्या आईचाही मृत्यू झाला. हे पाहून दिनेश वडिलांना तर सर्वच गमावल्यासारखं वाटलं... तब्बल दोन तास ते बेशुद्ध अवस्थेत होते. 

रुपाच्या मृतदेहावर अंत्यंस्कार तिच्या वडिलांच्याच घरी पार पाडले गेले. दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरलीय.