बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

Updated: Aug 9, 2015, 04:43 PM IST
बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन title=

गया:  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

२५ वर्षांपासून राज्यात असणाऱ्या जंगल राजपासून जनतेला मुक्ती हवी आहे आणि त्यासाठी भाजपला आशीर्वाद द्या, असं आवाहन मोदींनी केलं. बिहारनं जे देशाला दिलंय, तेवढं आजपर्यंत एकाही राज्यानं देता आलेलं नाही. पण पुढच्या पाच वर्षांसाठी हेच सरकार आणलं, तर आणखी पाच वर्ष अंधारात जातील. 

दिल्ली बिहारच्या सेवेसाठी तैनात आहे. पण बिहारच्या जनतेनं जर साथ दिली, तर विकासाची गंगा राज्यात वाहू लागेल असं आश्वासनही मोदींनी यावेळी दिलं. तिकडे, गयामध्ये ताजमहालापेक्षा जास्त पर्यटक येण्यासाठी उत्सुक आहेत. पण नीतिश सरकारनं बुद्धगयेच्या विकासासाठी काहीच केलं नाही असा आरोपही मोदींनी यावेळी केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.