पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांचे आणि मतदारांचे मानले आभार

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने चांगला विजय मिळवलाय. मणिपूरमधील चांगल्या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 11, 2017, 05:28 PM IST
पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांचे आणि मतदारांचे मानले आभार  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने चांगला विजय मिळवलाय. मणिपूरमधील चांगल्या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

लोकांनी आमच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. देशातील जनतेचे मनापासून आभार. उत्तर प्रदेशमधील जनतेचेही मनापासून आभार. भाजपाचा हा विजय ऐतिहासिक आणि सुशासनाचा आहे, असे मोदी म्हणालेत.

मोदी यांनी यावेळी काशीच्या जनतेचेही खास आभार मानले आहेत. काशीतील जनतेचे प्रेम मिळवून मी धन्य झालो आहे. आता भाजप येथील जनतेच्या विकासासाठी मनापासून प्रयत्न करेल, असे मोदी म्हणाले.