'पराभवावर भाजपला अंतर्मुख होण्याची गरज'

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साफ केला आहे, यावर राष्ट्रीय स्वंयम सेवक संघाने प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Feb 10, 2015, 04:49 PM IST
'पराभवावर भाजपला अंतर्मुख होण्याची गरज' title=

नवी दिल्ली : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साफ केला आहे, यावर राष्ट्रीय स्वंयम सेवक संघाने प्रतिक्रिया दिली आहे.

"भाजपचा एवढा मोठा पराभव अपेक्षित नव्हता. भाजपला अंतर्मुख होण्याची गरज आहे, तसेच किरण बेदी यांना कोणताही दोष देण्यात अर्थ नाही",  मतंही आरएसएसने मांडलं आहे. एक प्रकारे आरएसएसने भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.

दिल्लीतील विजयाबद्दल राष्ट्रीय स्वंयम सेवक संघाने आपचे नेते आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांपैकी ६७ जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. काँग्रेसला भोपळा, तर भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. दिल्लीत भाजपचा पराभव का झाला यावर भाजपसह विरोधी पक्षांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.