वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Updated: Feb 22, 2017, 02:33 PM IST
वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर  title=

नवी दिल्ली : भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकरी आत्महत्या करतात आणि मल्ल्या पैसे घेऊन पळून जातो अशा शब्दांत वरुण गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

दोन वर्षांत देशात साडेसात हजार शेतक-यांनी कर्जामुळे आत्महत्या केली. दुसरीकडे विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढल्याचे विधान वरुण गांधींनी केलंय. तसंच रोहित वेमुलाची सुसाईड नोट वाचून आपल्याला रडू कोसळल्याचेही वरुण गांधी यांनी म्हटलंय.

याच दोन्ही मुद्यांवरुन केंद्र सरकार अडचणीत आलं होतं. वरूण गांधी यांनी आपल्या भाषणात हे मुद्दे उपस्थित करून या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेत आणले. भाजपला नको असलेले मुद्दे पुन्हा उपस्थित केल्याने पक्षातील इतर नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येतंय.