पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील - जनरल राहील

पाकिस्तान आज भारताला धमकी देत म्हटले की युद्धासाठी सक्षम असलेली त्याचे सैन्य कोणत्याही आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.  पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या त्याला विसरू शकणार नाही. 

Updated: Nov 24, 2016, 11:05 PM IST
पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील - जनरल राहील  title=

इस्लामाबाद : पाकिस्तान आज भारताला धमकी देत म्हटले की युद्धासाठी सक्षम असलेली त्याचे सैन्य कोणत्याही आक्रमणाला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.  पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राइक केले तर भारताच्या अनेक पिढ्या त्याला विसरू शकणार नाही. 

पाकिस्तानने अशा प्रकारचे हल्ले केले तर भारत आपल्या मुलांना पुस्तकातून शिकवेल की सर्जिकल स्ट्राइक काय असते, असे गरळ पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी ओकली आहे. 

तसेच त्यांनी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा इन्कार केला. तसेच पाकिस्तानची सेना भारतीय लष्कराला धडा शिकविण्यात सक्षम आहे. 

शाहीद आफ्रिदीच्याय नावावर एका स्टेडियमचे उद्घाटन करताना शरीफ बोलत होते. शरीफ यांनी सांगितले की तीन वर्षाांच्या कार्यकाळानंतर ते सेवा निवृत्त होणार आहेत.