१६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला गेला

अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा आमिर खानचा वनवास अखेर संपला आहे. 

Updated: Apr 25, 2017, 07:42 PM IST
१६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला गेला  title=

मुंबई : अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा आमिर खानचा वनवास अखेर संपला आहे. तब्बल १६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेता आमिर खानला 'दंगल' चित्रपटासाठी सन्मानित केलं गेलं.

मुंबईमध्ये सोमवारी (२४ एप्रिल) झालेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर अॅवॉर्ड समारंभामध्ये मोहन भागवतांच्या हस्ते आमिर खानला दंगल चित्रपटात त्याने केलेल्या कामासाठी सन्मानित केलं गेलं.

या चित्रपटात आमिरने मल्ल महावीर फोगट यांची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन नितीश तिवारी यांनी केले आहे. २३ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच या चित्रपटात आमिरसोबत साक्षी तंवर आणि राजकुमार राव या अभिनेत्यांनीही प्रमुख भूमिका निभावल्या आहेत.