मोबाईलची बिलं भरता, मग वीजबिलं का नाही?-खडसे

राज्याचे बराच काळ विरोधीपक्ष नेते असलेले एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.  कारण, मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीजबिलं का भरता येत नाहीत?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना केला आहे.

Updated: Nov 24, 2014, 10:06 AM IST
मोबाईलची बिलं भरता, मग वीजबिलं का नाही?-खडसे title=

अकोला : राज्याचे बराच काळ विरोधीपक्ष नेते असलेले एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.  कारण, मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीजबिलं का भरता येत नाहीत?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना केला आहे.

शेतकऱ्यांना वीजबिलं माफ करा, अशी  मागणी खडसे विरोधीपक्षात बसलेले असतांना करत होत, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांचा सूर बदलला आहे.

मोबईलचं बिल हजार रुपये येतं तेव्हा कनेक्शन तुटण्याच्या भीतीने ते भरता. मग वीजबिलं का भरत नाही असा सवाल  खडसेंनी शेतकऱ्यांना केलाय.
 
वीजबिलात फार फात तर सवलत देऊ, पण माफ करणार नाही, असंही खडसे म्हणाले आहे. त्यामुळे वीजबिलमाफीसाठी विरोधी पक्षात असताना त्वेषाने भांडणाऱ्यांना आता मागण्यांच्या विसर पडला का असा सवाल उपस्थित होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.