काळजी घ्या... उकाडा वाढलाय!

राज्यात उकाडा वाढू लागलाय. त्यामुळे, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. 

Updated: Mar 25, 2017, 09:25 PM IST
काळजी घ्या... उकाडा वाढलाय! title=

मुंबई : राज्यात उकाडा वाढू लागलाय. त्यामुळे, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. 

विदर्भात तापमानाचा पारा कमालीचा वाढलाय. नागपुरात 43 अंश सेल्सियस तपमानाची नोंद झालीय. तर चंद्रपुरातही 42.2 अंश सेल्सियस इतक्या तपमानाची नोंद करण्यात आलीय.

विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यातही तापमान प्रचंड वाढलंय. त्यामुळे आगामी काळात उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.