नारायण राणे गद्दार... कोणी केला आरोप...

 नारायण राणे गद्दार असल्यामुळे तो इतरांना गद्दार समजतो असा आरोप  राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. 

Updated: May 9, 2017, 07:34 PM IST
 नारायण राणे गद्दार... कोणी केला आरोप...  title=

रत्नागिरी :  नारायण राणे गद्दार असल्यामुळे तो इतरांना गद्दार समजतो असा आरोप  राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. 

शिवसेनेचा एकही मंत्री किंवा आमदार कधीच गद्दार होणार नाही कारण त्यांना माहिती आहे आपण मंत्री झालोय ते शिवसेना, शिवसेना प्रमुखांमुळे आणि उद्धव ठाकरेंमुळे... तसेच ज्याला कावीळ झालीय त्याला सगळीच दुनिया पिवळी दिसते असा टोलाही नारायण राणे यांना रामदास कदम यांनी लगावला आहे.

 तसेच शिवसेनेचा एकही मंत्री किंवा आमदार फुटणार नसल्याचा दावा देखील रामदास कदम यांनी केलाय..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली होती,  सत्तेत राहून बाहेर पडण्याची ते भाषा करत आहेत. मात्र, सेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर भाष्य करताना रामदास कदम यांनी राणेंना गद्दार म्हटले आहे.