औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

जायकवाडी धरणातून औरंगाबाद महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणारी 700 एमएमची जलवाहिनी अचानक फुटली आहे.

Updated: Dec 4, 2016, 06:07 PM IST
औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली title=

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून औरंगाबाद महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणारी 700 एमएमची जलवाहिनी अचानक फुटली आहे. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.

या वर्षात दुस-यांदा जलवाहीनी फुटल्याची ही घटना घडली आहे. यामुळे औरंगाबाद शहराचे पाणी पुरवठा वेळापत्रक कोलमोडले आहे. जलवाहिनी दुरस्तीसाठी पाणी बंद करण्यात आलं आहे.