कृपाशंकरांनी मालमत्तेचे कागदपत्र जाळले?

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांच्या वांद्र्यातल्या बंगल्यामागं काही कचरा जाळण्यात आला आहे. हा कचरा म्हणजे क़ृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेसंबंधी कागदपत्रं असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

Updated: Mar 1, 2012, 12:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांच्या वांद्र्यातल्या बंगल्यामागं काही कचरा जाळण्यात आला आहे. हा कचरा म्हणजे क़ृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेसंबंधी कागदपत्रं असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

 

पोलिसांकडून कृपांविरोधात ठोस कारवाईला सरुवात झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी बेनामी मालमत्तेसंदर्भातली कागदपत्र जाळली असावीत, असा संशय आहे. जळालेल्या कचऱ्यात कृपाशंकर सिंह यांच्या लेटरहेडच्या कागदाच्या तुकड्याचा समावेश आहे, त्यामुळे जाळण्यात आलेल्या कचऱ्याचं गूढ अधिकच वाढलं आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अशा प्रकाराचा इन्कार केला आहे.

 

पण कृपाशंकर यांची  मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कोर्टाने आदेश दिल्यानंतर कृपाशंकर अज्ञातवासात गेले त्यानंतर अशा प्रकारे संशयस्पदरित्या काही कागदपत्र जाळण्याचे काम सुरू असल्याने कृपाशंकर यांच्याविरोधात संशय बळावत चालला आहे.