मिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप

 बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे. 

Updated: Nov 21, 2014, 11:17 AM IST
 मिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप title=

मुंबई : बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे. 

खात्यात किमान रक्कम नसल्याबद्दल सरार्स  दंड आकारणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेनं चाप लावला. RBIनं जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार आता दंड आकारण्यापूर्वी ग्राहकाला किमान १ महिन्याची नोटीस देणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यासाठी ईमेल, पत्र, एसएमएस असे पर्याय बँकांना वापरता येतील.

या एका महिन्यात ग्राहकाने मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही, तर त्याला कल्पना देऊन दंड आकारता येईल. मात्र हा दंड सरसकट आकारण्यासही रिझर्व्ह बँकेनं मज्जाव केला आहे. 

किमान रक्कम आणि खात्यात असलेल्या रक्कमेवरील तफावत यावर आधारित हा दंड असावा, असं RBIनं स्पष्ट केलं आहे. RBIची ही नवी नियमावली एक एप्रिल २०१५पासून लागू होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.