बाजारात भाज्यांचे भाव कडाडले

दुष्काळ आणि कडक उन्हामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. यात टॉमॅटोने 60 ते 70 रूपयांचा दर गाठलाय. प्रत्येक भाजी 40 ते 50 रूपये किलो दराने विकली जात असल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलंय. 

Updated: Jun 4, 2016, 08:40 AM IST
 बाजारात भाज्यांचे भाव कडाडले title=

मुंबई : दुष्काळ आणि कडक उन्हामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. यात टॉमॅटोने 60 ते 70 रूपयांचा दर गाठलाय. प्रत्येक भाजी 40 ते 50 रूपये किलो दराने विकली जात असल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलंय. 

महाराष्ट्रातून मुंबईत केवळ 30 टक्के भाजी येतेय. 60 टक्के भाजी परराज्यातून येते. टोमॅटो सध्या पंजाबमधून येत आहेत. 

घाऊक बाजारात टोमॅटोने 25 ते 40 रूपयांचा भाव गाठलाय. त्यामुळे किरकोळ बाजारात 50 ते 60 रूपये किलोने टोमॅटो विकला जातोय.