राज ठाकरेंच्या आक्षेपाला पालकमंत्र्याचा दुजोरा

मुंबईतील रस्त्यावर राहाणाऱ्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या हक्कावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. आता मुंबईचे गृहमंत्री जयंत पाटील यांनीही राज ठाकरेंना दुजोरा दिला आहे.

Updated: Dec 3, 2011, 12:03 PM IST
झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईतील रस्त्यावर राहाणाऱ्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या हक्कावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. आता मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही राज ठाकरेंना दुजोरा दिला
आहे. जयवंत पाटील यासंदर्भात म्हणाले की मुंबईतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशावेळी वाट्टेल त्या लोकांना मतदानाचे अधिकार दिले, तर लोकसंख्येचा
प्रश्न आणखी बिकट होईल.
काही दिवसांपूर्वीच, राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन रस्त्यावरील भटक्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या अधिकारावर आक्षेप घेतला होता.