संवेदनशील आमीर...

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान किती संवेदनशील आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांवरुन दिसून आलंय. त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. कारण `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातील आपले अनुभव सांगतांना आमीर इतका हळवा झाला की, त्याला आपल्या अश्रूंनाही आवरता आलं नाही.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 7, 2013, 12:18 PM IST

www.24tass.com , झी मीडिया, मुंबई
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान किती संवेदनशील आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांवरुन दिसून आलंय. त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. कारण `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातील आपले अनुभव सांगतांना आमीर इतका हळवा झाला की, त्याला आपल्या अश्रूंनाही आवरता आलं नाही.
‘आयडियाज दॅट मेक लाईफ ब्राईटर’ या कार्यक्रमासाठी आमीर मुंबईतल्या विक्रोळी इथं आला होता. त्यावेळी सत्यमेव जयतेच्या आठवणी सांगतांना आमीरचे डोळे पाणावले. सत्यमेव जयते या शो दरम्यान परिस्थितीशी झगडणाऱ्या आणि त्यावर मात करून विजय मिळवणाऱ्या अनेकांना आपण भेटलो, असं आमीर म्हणाला. हे सांगत असतांना आमीर इतका भावूक झाला की, त्याला अश्रू आवरता आले नाही.
असा हा हळवा आणि संवेदनशील अभिनेता सध्या धूम-३ आणि सत्यमेव जयतेच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.