भारत दुसऱ्या दिवसअखेर एक बाद १२०

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर एक बाद १२० धावांपर्यंत मजल मारली. 

Updated: Mar 17, 2017, 05:52 PM IST
भारत दुसऱ्या दिवसअखेर एक बाद १२० title=

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर एक बाद १२० धावांपर्यंत मजल मारली. 

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. यात रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच बळी घेतले. त्याच्या पंचकच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव ४५१ वर संपुष्टात आला. 

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडून मुरली विजय ४२ तर चेतेश्वर पुजारा १० धावांवर खेळत होते. सलामीवीर लोकेश राहुलने ६७ धावांची दमदार खेळी केली. तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्यासाठी भारताच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकून राहत फलंदाजी करणे गरजेचे आहे.