मलेशियाला हरवत भारत अंतिम फेरीत

सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने मलेशियाचा ६-१ असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय.

Updated: Apr 16, 2016, 08:12 AM IST
मलेशियाला हरवत भारत अंतिम फेरीत title=

मलेशिया : सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने मलेशियाचा ६-१ असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय.

अंतिम फेरीत भारतासमोर आता ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणर आहे. भारतीय संघाने परिपूर्ण खेळ करताना सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. 

एसव्ही सुनिल(दुसऱ्या मिनिटाला), हरजीत सिंग (सातवे मिनिट), रमणदीप सिंग(२५आणि ३९मिनिट), डॅनिश मुश्तबा (२७मिनिट) आणि तलविंदर सिंग(५०मिनिट) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला. 

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताच्या एसव्ही सुनिलने गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर सातव्याच मिनिटाला हरजीतने गोल करत २-० अशी आघाडी वाढवली. त्यानंतर भारताच्या खात्यात तिसरा गोल २५व्या मिनिटाला जमा झाला. मलेशियाने एक गोल करत ही चुरस वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय खेळासमोर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.