ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज तंबूत

भारत वि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या कसोटीतही गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळतेय. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलंय. 

Updated: Mar 5, 2017, 02:49 PM IST
ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज तंबूत title=

बंगळूरु : भारत वि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या कसोटीतही गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळतेय. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलंय. 

ऑस्ट्रेलिया दीडशे धावांचा टप्पा पार केला असून त्यांचा अर्धा संघ तंबूत परतलाय. यात रविंद्र जडेजाला तीन विकेट मिळवण्यात यश आलेय तर अश्विन आणि इशांत शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतलीये.

याआधीही कसोटीच्या पहिल्या दिवशी लियॉनने घेतलेल्या ८ बळींच्या जोरावर भारताचा संपूर्ण डाव १८९ धावांत संपुष्टात आला होता. पुण्याच्या कसोटीप्रमाणेच भारताची पहिल्या डावात अवस्था झाली होती.