भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय. 

Updated: Feb 1, 2016, 08:08 AM IST
भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान title=

सिडनी : तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय. कर्णधार शेन वॉटसनने झळकावलेल्या नाबाद १२४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला इतकी मोठी धावसंख्या उभारता आली.

सलामीवीर वॉटसनने ७१ चेंडूत १० चौकार आणि सहा षटकार लगावताना झुंजार १२४ धावांची खेळी केली. इतर फलंदाज झटपट बाद होत असताना वॉटसन मात्र खेळपट्टीवर एका बाजूने किल्ला लढवत होता. ख्रिस लेनने (२४) त्याला थोडीफार साथ दिली. तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर उस्मान ख्वाजाचा (१४) अडसर दूर केला. त्यानंतर शॉन मार्श झटपट बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल तीन धावा करुन परतला. 

 

पाहा लाईव्हस्कोर कार्ड