तिनं 'पागल' म्हणत शाहिद आफ्रिदीचा केला पाणउतारा...

भारताविरुद्ध जेव्हाही पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागतो तेव्हा पाक खेळाडूंवर त्यांच्याच देशात जास्त टीका होताना दिसते. आत्ताही असंच घडलंय. 

Updated: Feb 29, 2016, 04:00 PM IST
तिनं 'पागल' म्हणत शाहिद आफ्रिदीचा केला पाणउतारा... title=

इस्लामाबाद : भारताविरुद्ध जेव्हाही पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागतो तेव्हा पाक खेळाडूंवर त्यांच्याच देशात जास्त टीका होताना दिसते. आत्ताही असंच घडलंय. 

आशिया कपमध्ये भारतानं २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानला पाच विकेटनं पछाडलं... त्यानंतर पाकिस्तानमधून अनेक जणांनी आपल्याच टीमवर टीकास्र सोडलंय. यामध्ये सर्वात तिखट प्रतिक्रिया दिली ती पाकिस्तानी ड्रामा क्वीन कंदील बलोच हिने.... त्यामुळे ती चर्चेतही आलीय. 

कंदीलनं ट्विटरवर पाक टीमवर तीव्र प्रतिक्रिया दिलीय. इतक्यावरच तिचा राग शांत झाला नाही तर तिनं कॅप्टन आफ्रिदीला म्हटलंय. 'जेव्हापर्यंत हा पागल आफ्रिदी कॅप्टन राहील तेव्हापर्यंत काहीच होऊ शकत नाही' असं कंदीलनं म्हटलंय. 

यामुळे, काही क्रिकेटप्रेमी मात्र भलतेच नाराज झालेत. त्यांनी ट्विटरवर कंदील हिला तशाच तिखट प्रतिक्रिया देऊन लाखोल्या वाहिल्यात. 

यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून कंदील बलोच प्रकाशझोतात आली होती.