मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा बॅटिंगचा निर्णय

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये आरसीबीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: May 1, 2017, 04:07 PM IST
मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा बॅटिंगचा निर्णय  title=

मुंबई : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये आरसीबीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. हरभजन सिंग दुखापतग्रस्त झाल्यामुळे लेग स्पिनर कर्ण शर्माला संधी देण्यात आली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळण्याचा आरसीबीच्या आशा आधीच मावळल्या आहेत. तर 9 मॅचमध्ये 7 मॅच जिंकून मुंबईकडे 14 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीविरुद्धची मॅच जिंकली तर मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल.