मीठ ४०० रुपये किलो ही अफवा पसरवणारा कोण ?

अशी अफवा पसरली

Updated: Nov 20, 2016, 02:19 PM IST
मीठ ४०० रुपये किलो ही अफवा पसरवणारा कोण ? title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी एक अफवा अशी पसरली की लोकं दुकानांवर रांगा लावू लागले. कधी १६ रुपये किलोने विकलं जाणार मीठ आता ३०० ते ४०० रुपये किलो विकू जाऊ लागलं. देशात मीठाचा तुटवडा निर्माण होणार असून मीठ महागणार आहे अशी अफवा पसरली आणि लोकं काहीही विचार न करता दुकानांवर गर्दी करु लागले. देशभरात अगदी उत्तरांचल पासून ते हैदराबादपर्यंत ही अफवा पसरली होती.

मुंबईत देखील ही अफवा पसरली होती. पण अफवा पसरते कशी ? याला जबाबदार कोण ? अफवा ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्यामार्फतच जात असते. त्यामुळे सत्यता जाणून घेतल्याशिवाय गोष्टी पुढे सांगणं कधी कधी भारी पडू शकतं. यावरच काय म्हणतायंत या २ तरुणी.

पाहा व्हिडिओ बातमीच्या शेवटी

मीठ आणि अफवा यावर काय म्हणतायंत या तरुणी.