सकाळी उठल्याबरोबर रोज करा या 7 गोष्टी, लक्ष्मी माता होईल प्रसन्न आणि उजळेल नशीब

जोतिषशास्त्रात काय सांगितले आहे. त्याचा अभ्यास करुन सकाळी या गोष्टी केल्या पाहिजेत.

Updated: May 21, 2022, 10:12 PM IST
सकाळी उठल्याबरोबर रोज करा या 7 गोष्टी, लक्ष्मी माता होईल प्रसन्न आणि उजळेल नशीब title=

मुंबई : श्रीमंत व्हावे आणि आनंदी जीवन जगावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. परंतु, अनेकवेळा कष्ट करूनही त्या व्यक्तीला त्यानुसार प्रगती करता येत नाही. अनेकवेळा तो भरपूर कमावतो पण बचतीच्या नावावर त्याच्याकडे काहीच नसते. अशा स्थितीत व्यक्ती निराशेच्या दिशेने जाते. 

ज्योतिषशास्त्रात पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. या सोप्या आणि अचूक उपायांचा अवलंब केल्याने व्यक्ती पैशाच्या तंगीपासून मुक्त होऊ शकते. एवढेच नाही तर त्या व्यक्तीच्या घरात सुख-शांती राहते. जाणून घ्या, ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर कोणते काम करावे, ज्यामुळे देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते

सकाळी उठल्याबरोबर सर्व प्रथम आपल्या तळहाताकडे पाहून परमेश्वराचे स्मरण करा आणि 'कराग्रे वसते लक्ष्मी: करमधे सरस्वती' या मंत्राचा जप करा. करमोले स्तितो ब्रह्म प्रबते कर्दर्शनम् । असे मानले जाते की ब्रह्मासोबत सरस्वतीचा वास माणसाच्या हातात असतो. असे केल्याने दिवस चांगला जाईल आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील.

सकाळी उठण्यापूर्वी, अंथरुणावरून पाय खाली ठेवण्यापूर्वी, पृथ्वी मातेच्या चरणांना नक्कीच स्पर्श करा. शास्त्रानुसार माता पृथ्वी देखील मातेसारखी आहे.

शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी उठणे शुभ मानले जाते. स्नानासोबतच तांब्याच्या भांड्यात सूर्याला जल अर्पण करावे. कारण भगवान सूर्याबद्दल आदर आहे. हा ग्रह नोकरी, व्यवसाय, सत्तेचा कारक मानला जातो. त्यामुळे रोज अर्घ्य अर्पण केल्याने सूर्य ग्रह बलवान होतो, त्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होते.

शास्त्रात तुळशीचे महत्त्व खूप सांगितले आहे. तुळशीमध्ये लक्ष्मी वास करते. त्यामुळे तुळशीच्या रोपाची पूजा रोज करावी. यासोबतच तुळशीच्या रोपाची थोडीशी माती घेऊन रोज तिळक लावावेत आणि प्रत्येक कार्य सिद्धी होईल.

लक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्राचे रोज पठण करावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, यामुळे घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळे त्या व्यक्तीवर भगवंताची कृपा सदैव राहते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.

असे मानले जाते की दररोज शिवलिंगात दुधासह जलाभिषेक किंवा अभिषेक करावा. याचा फायदा व्यक्तीला नक्कीच होतो.

 

'या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/श्रद्धा/शास्त्र यातून संकलित करून तुमच्यापर्यंत पोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.'