विवाह रेषेवरील 'हे' चिन्ह तुमचं आयुष्य बर्बाद करेल, असं करा चेक

लग्न करण्यापूर्वी जाणून घ्या ही महत्वाची माहिती 

Updated: Dec 8, 2021, 03:01 PM IST
विवाह रेषेवरील 'हे' चिन्ह तुमचं आयुष्य बर्बाद करेल, असं करा चेक  title=

मुंबई : लग्न कधी होणार? जर झालं, तर वैवाहिक जीवन कसे जाईल? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहतात. कारण वैवाहिक जीवन हा जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हस्तरेषा शास्त्रात विवाह रेषा अतिशय विशेष मानली जाते. 

विवाह रेषेची स्थिती, व्यक्तीचे लग्न केव्हा होईल आणि त्याचे वैवाहिक जीवन कसे असेल? हे याद्वारे बनवलेले गुण दर्शवतात. ही रेषा तळहाताच्या बाहेरून हाताच्या सर्वात लहान बोटाखाली असते आणि काहीवेळा येथे एकापेक्षा जास्त रेषा असतात.

असं जाणून घ्या, कसं असेल तुमचं वैवाहिक जीवन 

विवाह रेषांच्या जवळ एकापेक्षा जास्त रेषा असतील तर ते एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध आणि विवाह दर्शवते.

दुसरीकडे, विवाह रेषेवर डोंगरासारखे चिन्ह असल्यास किंवा रेषा अशा चिन्हावर संपत असल्यास, अशा लोकांचे लग्न त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये किंवा नातेवाईकांमध्येच होते. तसेच या लोकांची लग्ने कमी वयात होतात.

जर डोंगरासारखे चिन्ह विवाह रेषेच्या मध्यभागी असेल तर अशा लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात. तथापि, ते परस्पर संवादाद्वारे सहजपणे सोडवले जाऊ शकतात.

त्याचबरोबर विवाह रेषेवर काळ्या रंगाचे गोल चिन्ह असणे अत्यंत अशुभ असते. अशा लोकांना आयुष्याचा बराचसा भाग जोडीदाराशिवाय घालवावा लागतो. कारण त्यांच्या जीवनसाथीचा कोणताही अपघात किंवा आजारामुळे अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यांना प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागते.

विवाह रेषेवर क्रॉस चिन्ह असणे देखील खूप अशुभ आहे. हे चिन्ह लग्न मोडल्यामुळे किंवा जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकाकी जीवन दर्शवते. अशा लोकांनी लग्न करताना काळजी घ्यावी.

विवाह रेषेवर चौरस चिन्ह असेल तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. ते त्यांच्या जीवनसाथीसोबत चांगले जमतात.

लग्न रेषेवर नक्षत्र असेल आणि सूर्य रेषेपर्यंत रेषा लांब असेल तर अशा लोकांचा विवाह उच्च आणि श्रीमंत कुटुंबात होतो. अशा लोकांचे नशीब लग्नानंतर असे बदलते की त्यांना स्वतःलाही ते कळत नाही.