मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला

मुंबई आणि दिल्लीच्या टीममध्ये वानखेडे स्टेडियमवर टी-२० मॅच होत आहे. मुंबईविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय दिल्लीने घेतला आहे.

Updated: Apr 14, 2018, 04:21 PM IST
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला title=

मुंबई : मुंबई आणि दिल्लीच्या टीममध्ये वानखेडे स्टेडियमवर टी-२० मॅच होत आहे. मुंबईविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय दिल्लीने घेतला आहे.

मुंबईच्या टीमला पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता विजय मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईची टीम मैदानात उतरली आहे.

मुंबईच्या टीमचा कॅप्टन रोहित शर्मा याला दोन्ही मॅचेसमध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीये. आता तिसरी मॅच होम ग्राऊंडवर होत असल्याने मुंबईला विजय मिळवण्याची एक चांगली संधी आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, एव्हीन लुईस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मयंक मार्कंडेय, प्रदीप सांगवान, मुस्तफिजूर रहमान, जसप्रीत बुमराह