ICC चे टेस्ट क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल, पहिल्या स्थानावरील भारतीय संघाची घसरण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने कसोटी क्रिकेटचे नियम बदलले आहेत.

Updated: Nov 20, 2020, 12:30 PM IST
ICC चे टेस्ट क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल, पहिल्या स्थानावरील भारतीय संघाची घसरण title=

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने कसोटी क्रिकेटचे नियम बदलले आहेत. यानंतर गुणांच्या तक्त्यात मोठा बदल झाला आहे. बुधवारीपर्यंत दुसर्‍या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ प्रथम तर अव्वल क्रमांकाचा भारतीय संघ दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. गुरुवारी, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नवीन नियमांतर्गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बदल करण्यात आले.

भारतीय संघाचे सध्या पॉइंट टेबलमध्ये 360 गुण आहेत तर ऑस्ट्रेलियाचे 296 गुण आहेत. भारताच्या तुलनेत ते 64 गुणांनी मागे आहेत परंतु कसोटी चँपियनशिप गुणांची संख्या निश्चित करण्यासाठी आयसीसीने नवीन नियम जाहीर केला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर भारतीय संघ दुसर्‍या स्थानावर पोहोचला तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचला.

कसोटी चम्पियनशिप अंतर्गत भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 4 कसोटी मालिका खेळल्या असून संघाची विजयाची टक्केवारी 75 टक्के आहे. ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाले तर 3 कसोटी मालिका खेळल्यानंतर त्यांची विजयाची टक्केवारी 82.22 टक्के आहे. त्यानुसार भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. बुधवारपर्यंत भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता तर ऑस्ट्रेलिया दुसर्‍या स्थानावर होता.

नियमात बदल झाल्यानंतर यापूर्वी तिसऱ्या क्रमाकांवर असलेला इंग्लंडचा संघ तिसर्‍या क्रमांकावर कायम आहे. त्याचप्रमाणे न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 50 आहे आणि तो चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे, ज्यांची विजयी टक्केवारी 39.52 आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचे संघ आहेत.