बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये 'हे' सहा खेळाडू नापास, दोन किमी धावणंही अशक्य

या सहाही खेळाडूंची पुन्हा चाचणी होणार

Updated: Feb 12, 2021, 12:51 PM IST
बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये 'हे' सहा खेळाडू नापास, दोन किमी धावणंही अशक्य title=

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये सहा खेळाडू नापास झाले आहेत. खेळाडुंना दोन किमी धावणं देखील अशक्य होतं. जयदेव उनाडकत, इशान किशन, सिद्धार्थ कौल, संजू सॅमसन, नितीश राणा आणिराहुल तेवातिया हे खेळाडू चाचणीत नापास झाले आहेत. या सहाही खेळाडूंची पुन्हा चाचणी होणार आहे. 

बीसीसीआयनं खेळांडूंची फिटनेस तपासण्यासाठी ही नवी चाचणी घेतली. त्यात हे सहा खेळाडू नापास झाले. बंगळुरूमध्ये ही टेस्ट घेतलेली. पुन्हा एक संधी त्यांना दिली जाणारय. जर त्यातही हे खेळाडून नापास झाले तर त्यांना पाच टी ट्वेटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजमध्ये संधी मिळणार नाहीये. 

या खेळाडुंना संधी 

भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात रोहित शर्मानं चांगली कामगिरी केली नाही. अवघ्या 6 आणि 12 धावा काढून तंबूत माघारी परतला. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतानं खेळलेल्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने तीन शतके ठोकली होती. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहितने सर्वाधिक 529 धावा केल्या आणि सामनावीर ऑफ द सीरिजचा पुरस्कार जिंकला. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात रोहित शर्मा पहिल्या कसोटीत झालेलं नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत आहे. 

दुसर्‍या कसोटी सामन्यात रोहित शर्मासह शुभमन गिल सलामीला जाईल. हे दोन्ही फलंदाज वेगाने धावा करण्यास तज्ज्ञ आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये शुभमन गिल यशस्वी झाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतकही ठोकले होते.

चेतेश्वर पुजारा 3 व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरेल. दुसर्‍या कसोटीत पुजारा इंग्लंडविरुद्ध खेळला तर भारतीय संघाला पहिली कसोटी जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात कोहलीने 72 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात विराट कोहली सामना जिंकू शकतो
  
उपकर्णधार अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये शतकी खेळी केल्यापासून रहाणे कोणतेही मोठे डाव खेळला नाही. रहाणे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही फ्लॉप होता. आता रहाणे दुसर्‍या कसोटी सामन्यात तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे. विकेटकीपर ऋषभ पंत फलंदाज म्हणून 6 व्या क्रमांकावर उतरणार आहे. विकेटकिपिंगसाठी थोड्या सुधारणा केल्यास संघाला आणखीन मजबुती मिळू शकते. 

ऑलराऊंडर सुंदर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजीसह फलंदाजीतही तरबेज असलेला सुंदर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी तयार आहे. स्पिनर अश्विननंही दुसऱ्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडण्यासाठी आणि गोलंदाजांवर नामूष्की आणण्यासाठी तयार आहे. 

शहाबाज नादीमला दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. अक्षर पटेल दुसऱ्या सामन्यासाठी खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला घाम फुटणार आहे. स्पिनर गोलंदाज अक्षर पटेलच्या खेळण्यानं भारतीय संघाला मजबुती मिळणार आहे.

जसप्रीत बुमराहवर बॉलिंग अटॅकची कमान आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंच्या दांड्या गूल करण्यासाठी बुमराहने तयारी केली आहे. दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्मा जसप्रीत बुमराहला साथ देईल. पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने 3 गडी बाद केले.