या अनुभवी खेळाडूला टी -20 वर्ल्ड कपपासून लांब ठेवणे टीम इंडियाला पडू शकते महागात

परिस्थितीशी पाहाता या निर्णयामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहिले जाऊ शकते.

Updated: Sep 30, 2021, 02:41 PM IST
या अनुभवी खेळाडूला टी -20 वर्ल्ड कपपासून लांब ठेवणे टीम इंडियाला पडू शकते महागात title=

मुंबई : टी 20 विश्वचषक 2021 हे 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आयसीसी विश्वचषक 2021 साठी निवडलेल्या टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात अनेक धक्कादायक नावे समाविष्ट आहेत आणि असे अनेक स्टार खेळाडू आहेत ज्यांना संधी न देता निवडकर्त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे आहे.

आता निवडकर्त्यांचा हा निर्णय योग्य आहे की नाही, हे येणारा काळच सांगेल, पण आताच्या परिस्थितीशी पाहाता या निर्णयामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहिले जाऊ शकते.

धवनला बाहेर ठेवण्यात टीम इंडियाची मोठी चूक

आयपीएलनंतर लगेचच टी -20 विश्वचषक खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्सचा वरिष्ठ खेळाडू शिखर धवन आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 130.45 च्या स्ट्राइक रेटने 454 धावा केल्या आहेत आणि सध्या तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

विश्वचषक हे यूएईमध्येच होणार आहे, अशा स्थितीत धवनचा फॉर्म पाहून निवडकर्त्यांनी त्याला संघात न घेता मोठी चूक केल्याचे दिसत आहे.

एवढेच नाही तर धवनच्या जागी ज्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे तो आयपीएलमध्ये पूर्णपणे फ्लॉप असल्याचे सिद्ध होत आहे.

हा खेळाडू खराब फॉर्ममध्ये

टी -20 विश्वचषक 2021 साठी निवडकर्त्यांनी 23 वर्षीय युवा फलंदाज इशान किशनला शिखर धवनच्या जागी ठेवणे अधिक योग्य मानले, परंतु सध्याच्या आयपीएलमध्ये या फलंदाजाची कामगिरी अत्यंत खराब ठरली आहे.

आयपीएल 2021 मध्ये नुकत्याच खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये हा फलंदाज फ्लॉप ठरला आहे. इशान किशनने 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळलेल्या सामन्यात फक्त 11 धावा केल्या.

ईशान किशनची खराब कामगिरी यानंतरही सुरू राहिली. इशान किशन 23 सप्टेंबर रोजी कोलकाताविरुद्ध फक्त 14 धावा करून बाद झाला. यानंतर, इशान किशन 26 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात केवळ 9 धावा करू शकला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईशान किशनने आतापर्यंत भारतासाठी फक्त 3 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यावर्षी त्याचे पदार्पणही झाले आहे. असे असूनही या फलंदाजाला टी -20 विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे.

शिखर धवन मोठा सामन्याचा खेळाडू

भारत हा एक संतुलित संघ आहे. शिखर ज्या फॉर्ममध्ये होता त्याचा विचार करता त्याला संधी मिळाली. शिखरला टी -20 विश्वचषक संघातही ठेवता आले असते, कारण तो मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो. त्याने भारतातसाठी अनेकदा हे केलं आहे.