IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर Virat आणि Hardik ला अश्रू अनावर

विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.

Updated: Oct 23, 2022, 06:29 PM IST
IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर Virat आणि Hardik ला अश्रू अनावर title=

मेलबर्न : अखेर टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपच्या पराभवाचा वचपा काढलाच. भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केलाय. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. यावेळी सामना जिंकवून दिल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले होते. या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.

टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गेल्यावर्षीच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढलाय.

अश्विनने मारलेल्या विजयी शॉटनंतर विराटचं कौतुक करण्यासाठी सर्व खेळाडू मैदानावर येत त्याच्या भवती जमले होते. यावेळी विराट कोहली भावूक झालेला दिसला. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या देखील डोळे पुसत असताना कॅमेरात कैद झाला. 

टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या विरोधात विराटने सर्वोत्तम खेळी करत पाकिस्ताच्या तोंडातला विजय हिसकावून आणला. पराभवाच्या वाटेवर असलेल्य़ा टीम इंडियासाठी विराट कोहलीने विजय खेचून आणला. त्याच्या या कामगिरीनंतर संपूर्ण जगातून त्याचं कौतूक होतंय. भारतच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येक व्यक्तीला विराटच्या या खेळीचं कौतूक वाटतंय. विराट कोहलीने विजय खेचून आणल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने देखील त्याला उचलून घेतलं.

पहिल्यांदा फलंदाजी करत पाकिस्तानने 8 विकेट्स गमावून 159 रन्स केले आणि विजयासाठी 160 रन्सचं आव्हान दिलं होतं. भारतानं हे आव्हान शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर गाठलं. विराट कोहलीने नाबाद 82 रन्स केले. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.