RCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral

Virat Kohli : काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचं हे विराट कोहलीकडून शिकायला पाहिजे. आयपीएलमध्ये पंजाबवर बेंगळुरूने विजय मिळवल्यानंतर विराटने पहिला व्हिडीओ कॉल तो पत्नी अनुष्का आणि मुलांना केला. 

नेहा चौधरी | Updated: Mar 26, 2024, 08:41 AM IST
RCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral title=
Virat kohli heartwarming FaceTime call anushka sharma kids vamika and akaay after Bengaluru win over Punjab IPL 2024

Virat Kohli FaceTime Call Video : आयपीएल 2024 चा थरार सुरु झाला आहे. सोमवारी पंजाब विरुद्धात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 2024 इंडियन प्रीमियर लीगमधील पहिला विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये विराट कोहलीने T20 कारकिर्दीतील 100 वे अर्धशतक झळकावलंय. T20 मध्ये 100 अर्धशतक झळकावणारा कोहली हा आशियातील पहिला खेळाडू ठरला.  पंजाब किंग्जविरुद्ध विराटने 77 धावांची खेळी केली. बेंगळुरूच्या विजयानंतर या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहेत. (Virat kohli heartwarming FaceTime call anushka sharma kids vamika and akaay after Bengaluru win over Punjab IPL 2024)

हृदयस्पर्शी Video Viral

विराट कोहली मैदानात असतानाही कुटुंबाप्रती असलेली त्याची जबाबदारी कायम पूर्ण करताना दिसला आहे. विराट कोहलीच्या सामन्यासाठी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मैदानात आवर्जून हजर असते. अशात ती आजूबाजूला असो किंवा नसो विराट पती म्हणून कायम इतरांसाठी प्रेरणा ठरला आहे. पती पत्नीमधील नातं कसं असावं याची झलक अनेक वेळा आपल्या खेळाच्या मैदानात दिसली आहे. 
दुसऱ्या मुलाच्या वेळी अनुष्का गर्भवती असताना मैदानातून अनुष्काला विराटने तू जेवली का? हे इशाऱ्याने विचारलं होतं. या सुंदर प्रेमाचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कायम विराट खेळासोबत आपली कुटुंबाप्रती जबाबदारी योग्यरित्या पूर्ण करतो. 

वडील असावा तर असा...! 

आयपीएल 2024 साठी विराट कोहली भारतात आला आहे. मात्र त्याच्यासोबत अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय (Akaay) भारतात आले नाही. अकायच्या जन्मापूर्वीपासून अनुष्का United Kingdom / लंडन आहेत. मुलाच्या जन्मावेळी खास सुट्टी टाकून विराटही लंडनला गेला होता. पण तो जरी भारतात आला असला तरी त्याचं कुटुंब अजूनही लंडनला आहे. 

अशात विजयानंतर विराट कोहलीने अनुष्का, वामिका आणि अकायला व्हिडीओ कॉल केला. या प्रेमळ संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट त्याच्या प्रत्येक क्षण आपल्या कुटुंबात सोबत साजरा करतो. मग मॅच जिंकण्याचा आनंद असो किंवा मॅचमध्ये मिळालेला पराभव असो. विराट कायम पत्नी अनुष्काशी पहिले संवाद साधतो. व्हिडीओ कॉलवर बोलताना विराटचे मजेदार चेहरे बनवतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. व्हर्च्युअल कॉलद्वारे त्याने आपल्या मुलांसोबत आणि पत्नीसोबत सुखाचे काही क्षण व्यतित केले. त्यांच्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव केला. 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेऊन त्यांनी गर्भवती अनुष्काची काळजी घेतली होती. दोन महिने त्यांने मैदानापासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवला होता.