शेतकरी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची मदत - खडसे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हजार कोटी रूपयांची मदत केल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला. 

Mar 11, 2015, 06:53 PM IST

विधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!

विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. 

Mar 11, 2015, 10:10 AM IST

शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी आमदारही आक्रमक

शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी आमदारही आक्रमक

Mar 10, 2015, 02:00 PM IST

शेतकऱ्यांना मदत द्या, विरोधकांची सरकारकडे मागणी

दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत अद्याप दिलेली नाही. या विरोधात आज विरोधकांनी विधानसभेत रणकंदन केलं. 

Mar 9, 2015, 11:48 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस यांचा परभणीत हुर्यो

आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या कुटुंबीयांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार होते. तसे नियोजित दौऱ्यात होते. मात्र, गावात जाऊनही त्यांनी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Mar 5, 2015, 06:05 PM IST

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

 दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.

Mar 5, 2015, 01:06 PM IST

शेतकऱ्यांचा 'मार्चएण्ड', मुख्यमंत्र्याचं 'पिंपरी लाईव्ह'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात दौरा करून प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधत रात्री पिंपरी या गावातच शेतकऱ्याकडे मुक्काम ठोकला.

Mar 4, 2015, 12:58 PM IST