भूकबळी

या देशातील २० लाख नागरिक भूकबळी ठरणार? संयुक्त राष्ट्रानं व्यक्त केली चिंता

पाऊस न पडल्यानं मुकी जनावरं व्याकुळतेनं प्राण सोडताना दिसत आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे

Jun 6, 2019, 08:42 AM IST

मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.

Oct 21, 2017, 08:58 PM IST

गोंदियात भुकेमुळे महिलेचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामध्ये भुकेमुळे पस्तीस वर्षांच्या ललिता रंगारी या महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.

Jun 27, 2015, 11:30 PM IST

भंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी

प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.

Jul 16, 2013, 09:05 PM IST

जगातला प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी!

जगभरात प्रत्येक दिवशी २० हजार मुलांच्या पोटात अन्नाचा कणही जात नाही आणि ते भूकेला बळी पडतात. दरवर्षी १ अब्ज ३० कोटी टन खाद्य पदार्थाची नासाडी होते आणि जगातील प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी झोपतो... ही सत्य परिस्थिती नुकतीच एका अहवालाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आलीय.

Jun 12, 2013, 04:38 PM IST