विदेश सचिवांची नाव न घेता पाकिस्तानवर टीका

विदेश सचिवांची नाव न घेता पाकिस्तानवर टीका

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या रायसीना डायलॉग मध्ये परराष्ट्र खात्याचे सचिव एस जयशंकर यांनी दहशतवादाचा जगासाठी धोका असल्याचं म्हटलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या रायसीना डायलॉगमध्ये त्यांनी म्हटलं की, सध्या दहशतवाद संपवण्याचं आव्हान जगासमोर आहे. मानवाच्या सुरक्षेसाठी नाही तर जगाच्या विकासासाठी देखील दहशतवाद संपवणं गरजेचं आहे. 17 जानेवारीपासून सुरु झालेल्या या रायसीना डॉयलॉगमध्ये 65 देशांचे जवळपास 250 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

Jan 18, 2017, 04:26 PM IST