इंजिनिअर्संना अच्छे दिन येणार, 30 हजार जागांची भरती

आगामी वर्षांत इंजिनिअर्संना अच्छे दिन येणार आहेत.

PTI | Updated: Oct 27, 2018, 10:43 PM IST
इंजिनिअर्संना अच्छे दिन येणार, 30 हजार जागांची भरती title=

मुंबई : आगामी वर्षांत इंजिनिअर्संना अच्छे दिन येणार आहेत. बड्या कंपन्यांमध्ये जवळपास ३० हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. डिलिव्हरी सर्विस, ग्राहक सेवा केंद्र, आणि कंपनी इंजिनिअर्सच्या माध्यमातून या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

तंत्रज्ञानाशी संबंधित या नोकऱ्या असणार आहेत. एचसीएल या बड्या आयटी कंपनीकडून आगामी काळात २५ ते ३० हजार नोकऱ्या देण्यात येणार आहेत. टीसीएसकडूनही आणखी ४० टक्के नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.