आज लक्ष्मीपूजन..काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व
आज सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.
देशभरात दिवाळीची धामधूम..राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
दिवाळीची धामधूम देशभरात सुरू आहे. या दिवसात एकमेकांना मिठाई देत आणि दिवे लावून आनंद साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाची दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत साजरी करणार आहेत. भारत-चीन सीमेवर जाऊन पंतप्रधान दिवाळीचा उत्सव साजरा करणार आहेत.उरीच्या जवानांनाही पंतप्रधान भेट देण्याची शक्यता आहे.
४८ तासांनंतर बनलेली रांगोळी उधळल्याने दीपिका संतापली
४८ तास मेहनत करून बनविलेली रांगोळी रजपूत करणी सेना समर्थकांनी पूर्णपणे उधळून लावली आहे.
जिओ युजर्ससाठी वाईट बातमी, महाग होणार रिचार्ज
४५९ रुपयांमध्ये ८४ दिवस वैधता असणाऱ्या लोकप्रिय प्लानमध्ये कंपनीने बदल केले असून याच्या किंमतीत १५ टक्के वाढ केली आहे.
विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने तिघांना चिरडले
भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिघांना चिरडले.त्यातील २ महिलांची प्रकृती गंभीर तर १ बालक जखमी झाले आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर 8 जण जखमी झालेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपाचा परतीचा प्रवास - अशोक चव्हाण
नांदेड आणि गुरुदासपूरमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
झी २४ तास च्या 'प्रदुषणमुक्त दिवाळी'ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
शाळेतील विद्यार्थी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेत आहेत.
चंद्रपूर, गडचिरोलीत मतदान सुरू
निवडणुकीच्या या कामात जवळपास ७०० महसूल विभागाचे आणि ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात सकाळच्या सत्रात ३६ टक्के मतदान
सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूकीत सकाळी साडे अकरापर्यंत 36 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत भाजपा खासदार संजय काका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.