सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार

द्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० आणि १२ वीच्या उरलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जून दरम्यान होणार आहे.  

Updated: May 15, 2020, 08:25 AM IST
सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार title=

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० आणि १२ वीच्या उरलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जून दरम्यान होणार आहे. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी १२ वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जोरदार सुरु आहे. येत्या ५० दिवसात ते पूर्ण होईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी  सांगितले.  

शिक्षकांबरोबर एका वेबिनारमधे  ते बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते. सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार, असे संकेत त्यांनी यावेळी दिलेत. उत्तरपत्रिका तपासून झाल्या की ताबडतोब मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करु, असे ते म्हणालेत. 

कोरोना विषाणूबाबतची परिस्थिती सामान्य झाली की मगच शाळा उघडतील आणि शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे  पालन करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यासंदर्भात NCERT चे कृतीदल विद्यापीठ अनुदान आयोगाच्या देखरेखीखाली दिशानिर्देश तयार करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच नवीन शैक्षणिक धोरण वैज्ञानिक वृत्ती आणि संशोधनाचा पाया घालणारे असेल, असे सांगत ते म्हणालेत ९ वी आणि ११ वीच्या परीक्षांमध्ये यंदा अनुत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा एकदा शाळेची परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी सीबीएसईने दिली आहे.  ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच कुठल्याही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.