ऐश्वर्याकडून सलमान खानबाबत मोठा खुलासा

धक्कादायक माहिती 

ऐश्वर्याकडून सलमान खानबाबत मोठा खुलासा  title=

मुंबई : आजच्या दिवशी 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय बच्चन आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं ब्रेकअप हे बॉलिवूडमधील सर्वात खराब ब्रेकअपपैकी एक आहे. ऐश्वर्याने तर सलमानवर मारण्याचा आरोप देखील केला होता. 2002 मध्ये ऐश्वर्याने हे आरोप लावले होते. 

2002 मध्ये फिल्मफेअर अवॉर्डमध्ये ऐश्वर्याला पुरस्कार मिळाला होता. तेव्हा तिचा हात फ्रॅक्चर होता आणि तिने तेव्हा चष्मा घातला होता. रिपोर्टनुसार, तेव्हा ऐश्वर्या आपल्या जखमा लपवत होती. मात्र फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती शिड्यांवरून पडली. 

ब्रेकअपनंतर दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं की, सलमान खान मला फोन करून काहीही बोलत असे. सलमान खान माझ्यावर संशय घेत असे. त्याला असं वाटत होतं की, माझं को स्टारसोबत अफेअर सुरू आहे. माझं नाव अगदी शाहरूख ते अभिषेक या सगळ्यांबरोबर जोडलं गेलं. 

ऐश्वर्याने सांगितलं की, सलमान खानने तिला भरपूर मारलं. माझं नशीब चांगल होतं की, मला काही लागलं नाही. मी शुटिंग अशी जात असे की, काही झालंच नाही. मी फोन उचलला नाही तर सलमान खान स्वतःला त्रास देत असे.