अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. राधिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने यावर पहिलांदाच भाष्य केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 18, 2024, 02:32 PM IST
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले? अनन्या पांडेने केला खुलासा  title=

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होऊन जवळपास 2 महिने झाले आहेत. यानंतरही दोघांच्या लग्नाची चर्चा सुरुच आहे. या लग्नाला जगभरातील नामांकित व्यक्तिमत्त्व उपस्थित होते. अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सारेच कलाकार लग्नाला उपस्थित होते. यानंतर अशी चर्चा रंगली होती की, कलाकारांना पैसे देऊन बोलावलं होतं. अभिनेत्री अनन्याने राधिका आणि अनंत यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. दोघांचं नातं किती घट्ट आहे याबद्दल पण ती म्हणाली. 

पाहुण्याला पैसे दिले होते?

'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्री अनन्याने सांगितले की, अनंत आणि राधिका हे तिचे मित्र असल्यामुळे तिने हाय-प्रोफाइल अंबानी लग्नाला हजेरी लावली होती. बॉलीवूड सेलिब्रिटींना लग्नासाठी पैसे दिले जात असल्याच्या अफवाही अनन्याने फेटाळून लावली आहे. Mashable India मधील मुलाखतीत, अनन्याला अनंतच्या लग्नाच्या सोहळ्यातील डान्सबद्दल विचारण्यात आले. ते माझे मित्र आहेत. मला कळत नाही की, लोकं असे का विचार करतात. अर्थात माझ्या मित्रांच्या लग्नात मी मनापासून नाचणार. मला प्रेम साजरे करायला आवडते आणि मी ते केले. 

अनंत आणि राधिकाचे नाते कसे आहे

अभिनेत्रीने अनंत आणि राधिकाच्या नात्याचे Pure Love असे वर्णन केले आणि त्यांच्यातील खोल बंधाबद्दल उत्साहाने सांगितले. तो म्हणाला, 'लग्नातून एक मोठा धडा मिळाला की, खूप काही घडत होतं, पण जेव्हाही अनंत आणि राधिकाने एकमेकांना पाहिले तेव्हा फक्त निखळ प्रेम दिसत होतं. जणू त्यांच्या मागे व्हायोलिन वाजवत आहेत. हे मला माझ्या आयुष्यात हवे आहे. अडचणी कितीही असो, तुम्ही आणि तो एक व्यक्ती आणि नाते शेअर करतो.

प्रत्येक पाहुण्याकडे विशेष लक्ष दिले गेले

अनंत आणि राधिकाच्या लग्नात अनन्या पांडे इथेच थांबली नाही, तिने अंबानी कुटुंबातील प्रत्येक पाहुण्याला दिलेल्या वागणुकीचं देखील कौतुक केलं. अनन्या म्हणते की, अंबानी कुटुंबांनी प्रत्येक पाहुण्याला मोलाची जाणीव करून दिली. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न झाले. लग्नाआधी आणखी बरेच सेलिब्रेशनही आयोजित करण्यात आले होते. चित्रपट जगत, क्रीडा जगत, राजकारण आणि व्यावसायिक जगतातील लोकांनी लग्नाला हजेरी लावली आणि नवीन जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

या चित्रपटात अनन्या दिसणार 

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल ती तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पहिल्या वेब सीरिज 'कॉल मी बे' च्या यशाचा आनंद घेत आहे. या शोमध्ये वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लोकांना ही मालिका आवडली असून त्यातील काही दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. आता लवकरच अनन्या विहान सामतसोबत 'CTRL'मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.