साराच्या लोकप्रियतेमुळे बोनी कपूर चिंतेत, काय आहे कारण?

 बोनी कपूर यांना येतोय राग 

Updated: Jan 20, 2019, 12:36 PM IST
साराच्या लोकप्रियतेमुळे बोनी कपूर चिंतेत, काय आहे कारण?  title=

मुंबई : सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींना 2018 हे वर्ष अतिशय खास ठरलं आहे. या दोघींनी फक्त बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं एवढंच नाही तर या दोघींनी देखील चाहत्यांची मन जिंकली. तसेच खासगी आयुष्यात देखील सारा आणि जान्हवी एकमेकींच्या खूप जवळ आहेत. पण तुलनेत सारा अली खानला जान्हवीपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली. जान्हवी कपूरने पहिलं पदार्पण करूनही सारा अली खान मागून येवून लाइमलाइटमध्ये राहिली. 

सारा अली खान अगदी पहिल्याच सिनेमापासून प्रेक्षकांची आवडती बनली. 'केदारनाथ' आणि आता त्यामागून 'सिंबा' या दोन्ही सिनेमांनी साराला लोकप्रियता आणि प्रेक्षकांच भरभरून प्रेम दिलं. असं वाटतं की, साराच्या तुलनेत जान्हवी कपूर कुठे तरी मागे पडली आहे. 'सैराट' सारख्या लोकप्रियता मिळवलेल्या मराठी सिनेमाचा बॉलिवूडमध्ये रिमेक झाला. करण जोहरच्या 'धडक' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं खरं पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. 

हे फक्त आम्हीच बोलतोय असं नाही, जान्हवीचे वडिल निर्माता बोनी कपूर यांना देखील याची चिंता वाटू लागली आहे. बोनी कपूर या गोष्टीमुळे चिंतेत आहेत की, त्यांची मुलगी जान्हवी कपूर लोकांमध्ये तशी लोकप्रियता मिळवू शकली नाही जेवढी लोकप्रियता सारा अली खानला मिळाली.  श्रीदेवीच्या निधनानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी बोनी कपूर यांच्यावर आहे. श्रीदेवीचं जाणं आणि जान्हवीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं हे एकाचवेळी झालं. श्रीदेवी असे पर्यंत जान्हवी कपूरला खूप मोठा आधार होता. पण श्रीदेवीच्या अचानक जाण्याने तो आधार गमावला आणि संपूर्ण जबाबदारी बोनी कपूर यांच्यावर आली. 

फक्त मुलींच संगोपनच नाही तर त्यांच्या करिअरची जबाबदारी देखील बोनी कपूर यांच्यावर आहे. त्यामुळे बोनी कपूर सारा अली खानच्या PR टीमशी खूप दुःखी आहेत. त्यांच असं म्हणणं आहे की, त्यांच्या PR टीमपेक्षा साराची PR टीम अधिक दमदार आहे. तसेच आपण सोशल मीडियावर देखील पाहत आहोत जान्हवीची 'ती' चमक कुठे तरी हरवली आहे. याची अनुभूती सोशल मीडियावरून येत आहे.