लग्नानंतर रणवीर सिंह होणार घरजावई?

काय आहे खरं कारण 

लग्नानंतर रणवीर सिंह होणार घरजावई?  title=

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल्स रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या दोघांच्या लग्नाला अवघे काहीसे दिवस राहिले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या अनेक विधी सुरू देखील झाल्या आहेत. पण आता या दोघांच्या लग्नानंतरच्या आयुष्याची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. असं सांगितल जातं की, लग्नानंतर दीपिका नाही तर रणवीर आपलं घरं सोडून घरजावई होणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर - दीपिका यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. लग्नानंतर रणवीर सिंह आपलं घर सोडून दीपिका पदुकोणच्या घरी राहायला जाणार आहे. लग्नानंतर मुली आपलं घर सोडून नवऱ्याच्या घरी जातात पण दीपिका - रणवीरच्या लग्नानंतर मात्र हे थोडं वेगळं होणार आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका बऱ्याच दिवसांपासून आपलं ड्रीम होम शोधत आहेत. पण त्यांना आतापर्यंत हवं तसं घर मिळालेलं नाही. तसेच दोघांना घाईगडबडीत कोणताच निर्णय घ्यायचा नाही.त्यामुळे लग्नानंतर रणवीर दीपिकाच्या घरी राहायला जाणार असं ठरवलं आहे. यामागचं खरं कारण असं आहे की, रणवीर आपल्या कुटुंबासोबत राहतो तर दीपिका एकटीच राहते. तसेच रणवीरला वाटतं नाही की, दीपिकाने आपलं घर सोडावं कारण तिने हे घर अतिशय कष्टाने बनवलं आहे.