...म्हणून दीप-वीरच्या रिसेप्शनला रणबीर- आलिया गैरहजर

बऱ्याच सेलिब्रिटींनी या स्वागत सोहळ्याला हजेरी लावली पण...

Updated: Dec 4, 2018, 01:48 PM IST
...म्हणून दीप-वीरच्या रिसेप्शनला रणबीर- आलिया गैरहजर  title=

मुंबई :  हिंदी कलाविश्वात राम-लीला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग या दोघांनीही त्यांच्या दिमाखदार विवाहसोहळ्यानंतर मित्रपरिवारासाठी स्वागतसोहळ्यांचं आयोजन केलं होतं. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ग्रँड हयात येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये बऱ्याच बी- टाऊन सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

दीपिकासोबत फारसं चांगलं समीकरण नसणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफनेही या स्वागत सोहळ्याला हजेरी लावत दीप-वीरला शुभेच्छा दिल्या. पण दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि सध्याचा चांगला मित्र अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी आलिया भट्ट यांची मात्र या सोहळ्याला अनुपस्थिती होती. 

रणबीर आणि आलियाच्या न येण्याने बऱ्याच चर्चांनीही जोर धरला. ते नेमके का आले नसावेत याविषयीच अनेकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली. अखेर त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलिया सध्या 'ब्रह्मास्त्र' या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यातच रणवीर आणि आलियाच्या रिसेप्शनच्या आधीही ते जवळपास २० तास चित्रीकरणातच व्यग्र होते. त्यामुळे स्वागत सोहळ्यामध्ये येणं त्यांना शक्य झालं नाही. रणबीर आणि आलिया स्वागत सोहळ्याला गेले नसले तरीही त्यांच्या शुभेच्छा मात्र दीप-वीरपर्यंत पोहोचल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.