ऐश्वर्याने ज्याची खिल्ली उडवली, त्यालाच पती म्हणून का निवडलं?

लग्नापूर्वी ऐश्वर्या, अभिषेकची का उडवायची खिल्ली...  

Updated: Dec 10, 2021, 11:51 AM IST
ऐश्वर्याने ज्याची खिल्ली उडवली, त्यालाच पती म्हणून का निवडलं? title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चनची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. आता अभिषेक आणि ऐश्वर्या अनेकांना कपल गोल्स देत असतात. पण ऐश्वर्या-अभिषेक यांची पहिली भेट 2002 साली प्रदर्शित झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' सिनेमाच्या माध्यमातून  झाली नसून, त्यांची पहिली ओळख ऐश्वर्याचा पहिला सिनेमा 'और प्यार हो गया' सिनेमाच्या माध्यमातून झाली. तेव्हा अभिषेक अभिनय क्षेत्रात नव्हता.

त्यावेळी अभिषेक अभिनयापासून दूर होता आणि प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करत होता. अभिषेकने ऐश्वर्यासोबतच्या त्या पहिल्या भेटीचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. एका वृत्तानुसार, अभिषेकने 'द रणवीर शो पॉडकास्ट'मध्ये खुलासा केला. तो वडील अमिताभ बच्चन यांच्या 'मृत्युदाता' सिनेमात प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करत होता.

वडिलांच्या सिनेमाच्या लोकेशनची रेकी करण्यासाठी त्याला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले. बॉबी देओल आणि ऐश्वर्याही स्वित्झर्लंडमध्ये सिनेमाचे शूटिंग करत होते. त्यानंतर बॉबी देओल आणि ऐश्वर्याने त्याला डिनरसाठी बोलावले.  तिघे डिनरसाठी पोहोचले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिषेकने सांगितले की, पहिल्या भेटीत ऐश्वर्याला माझे बोलणे समजले नाही. ती अभिषेकची खिल्ली उडवायला लागली. ती म्हणायची, 'तू जे बोलत आहे, त्यातला एकही शब्द मला समजत नाही. पुढे अभिषेक म्हणाला, ती इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये शिकली आणि नंतर बोस्टनला गेली. त्यामुळे कदाचीत माझं बोलणं तिला कळालं नसेल. 

अभिषेकने 2000 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर ऐश्वर्यासोबतही काम केले. दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' आणि 'गुरू' सारखे सिनेमात काम केलं. अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र काम करत असताना प्रेमात पडले आणि त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. तिचं नाव आराध्या असं आहे.