11 गूढ मृत्यू : आत्महत्या करण्यापूर्वी खाल्ले होते हे जेवण...

काय आहे हा प्रकार 

11 गूढ मृत्यू : आत्महत्या करण्यापूर्वी खाल्ले होते हे जेवण...  title=

नवी दिल्ली : बुराडीचील एकाच कुटुंबातील 11 लोकांच्या मृतदेहांबाबत अजून गुंता सुटलेला नाही. घरामध्ये मिळालेल्या काही गोष्टींमार्फत फॉरेंसिक लॉबमधून याची तपासणी केली जाणार आहे. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाटिया कुटुंबातील हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे आहे. या कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी जेवण पार्सल बाहेरून मागवलं होतं. हे पार्सल घेऊन एक तरूण या घरी आला होता. आता या कुटुंबाची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

मंगळवारी या मृतदेहांचे पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आले. या रिपोर्टमध्ये काही लोकांच्या पोटात फ्लूड (पातळ पदार्थ) सापडला आहे. याची देखील तपासणी केली जाणार आहे. यामुळे अद्याप प्रकरणाचा ढोस पुरावा हाती आलेला नाही. तसेच नातेवाइकांनी सांगितले, की भाटिया कुटुंबीय हे गेल्या महिन्यात साखरपुडा झालेल्या प्रियंकाच्या विवाहाची तयारी करीत होते. तिचाही या मृतांमध्ये समावेश आहे. पोलीस या प्रकरणी  तपास करीत असून १५ ते ७७ वयोगटांतील ११ जणांनी आत्महत्या करारानुसार मोक्ष मिळवण्याच्या उद्देशातून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. ललित यांनी लिहिलेली वही देखील सापडली आहे. ज्यामध्ये कोणत्या गोष्टी कशा घडतील याचा खुलासा केलेला आहे.

त्यामुळे त्यात धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनही आहे. हस्ताक्षरातील नोंदीत मानवी शरीर हे तात्पुरते असून मृत्यूच्या भीतीवर डोळे व तोंड बांधून मात करता येते असे म्हटले होते. यात मरण पावलेल्या नारायणी देवी यांच्या कन्या सुजाता नागपाल यांनी सांगितले, की माध्यमे यात चुकीचे अंदाज करीत असून, आत्महत्येचे कारण असल्याचे पसरवत आहेत. मी आईशी रोजच बोलत होते. सगळे काही व्यवस्थित चालले होते. आमचे कुटुंब सुशिक्षित होते.